Mahatma Phule Jayanti Ushtav : महात्मा फुलेंनीही घडवला होता वाल्याचा वाल्मिकी ! खून करायला आलेला lok

 

Mahatma Phule Jayanti : महात्मा फुलेंनीही घडवला होता वाल्याचा वाल्मिकी ! खून करायला आलेला मारेकरी...








महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांची बोलणी, टोमणे, प्रसंगी शिव्या खाव्या लागल्या. काहींनी त्यांच्यावर शेणही फेकले. पण ते आपल्या जीवित कार्यापासून ढळले नाहीत. हे पाहून त्यांना जीवे मारण्यासाठी दोन मारेकरी पाठवले होते.

मध्यरात्री झोपेत फुलेंना खुडबूड ऐकू आल्याने जाग आली. घरात समईच्या मंद प्रकाशात दोन अंधुक आकृत्या दिसल्या आणि कोण आहे रे तिकडे असं त्यांनी जोरात विचारलं. त्यावेळी एक मारेकरी म्हणाला तुमचा निकाल लावायला आलोय. तर दुसरा ओरडला तुम्हास यमसदनास धाडावयास आलो आहोत.


त्यांच्या या उद्गाराने मारेकरी भानावर आले. त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली. उलट ज्यांनी तुम्हास मारावयास पाठवले त्यांना मारण्याची परवानगी द्या असं ते म्हणाले.

ही सूड बुद्धी नसावी अशी समज फुलेंनी त्यांना दिली आणि ते दोघे फुलेंचे सहकारी झाले. यातील एकाचे नाव रोडे तर दुसरे पं. धोंडिराम नामदेव.

ही चार-पाच वाक्ये एखाद्याचं संपूर्ण जीवन कसं बदलवू शकतं असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण महात्मा फुले ही वाक्ये फक्त बोलले नाहीत तर जगले आहेत. त्यांच्या जीवनाचा तो सार आहे. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्य वेचले नाही तर त्यांनी दिलेले विचार आजही तंतोतंत लागू होतात आणि समाजाला दिशा देणारे आहेत.

टिप्पण्या